पोर्ट ऑफ स्पेन – कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातं वेस्टइंडिजचा 59 धावांनी पराभव करत विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्याच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
#INDvWI : विराटचे दमदार शतक, वेस्ट इंडिजसमोर 280 धावांचे लक्ष्य
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने 50 षटकांत 7 बाद 279 धावा केल्या. त्यानंतर विंडीजला पावसामुळं 46 षटकांत 270 धावांचं आव्हान देण्यात आलं. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा संघ 210 धावांपर्यंत मजल मारू शकला.
ICYMI: A supreme 120 from Virat Kohli and a four-wicket haul from Bhuvneshwar Kumar helped India claim the second ODI against West Indies by 59 runs (DLS).#WIvINDhttps://t.co/7yOhtTshqv
— ICC (@ICC) August 12, 2019
सामन्यात फलंदाजीमध्ये विराट कोहली याने कारकिर्दीतील 42 वे शतक पूर्ण केले. त्याने 125 चेंडूत (14 चौकार आणि 1 षटकार) 120 धावा केल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. श्रेयस अय्यरने 68 चेंडूत 71 धावा करत महत्वपूर्ण योगदान दिलं.
गोलंदाजीमध्ये वेगवान गोलंदाजानी प्रभावी गोलंदाजी केली. भुवनेश्वर कुमार याने 8 षटकांत 31 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांनी 2 तर रविंद्र जडेजा आणि खलील अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.