पर्थ : सलामीवीर शफाली वर्माची तडाखेबाज खेळी आणि फिरकीपटू पूनम यादवच्या अचूक गोलंदांजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने टी-२० क्रिकेट विश्वचषकमध्ये सोमवारी बांगलादेशवर १८ धावांनी मात करत विजय नोंदविला. भारताचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय ठरला.
Two wins from two for #TeamIndia at the #T20WorldCup 🔥🔥
Onwards and upwards from here on! 💪💪Scorecard 👉 https://t.co/Pknzdpr9fD pic.twitter.com/9S9KFV1qcT
— BCCI Women (@BCCIWomen) February 24, 2020
भारतीय संघाने विजयासाठी दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघास २० षटकांत ८ बाद १२४ धावांच काढता आल्या आणि त्यांना १८ धावांनी पराभवाला सामोरं जावं लागलं. बांगलादेशकडून फलंदाजीत निगार सुल्तानाने ३५(२६), मुर्शिदा खातूनने ३०(२६) आणि फाहिमा खटुन हिने १७(१३) धावांची खेळी केली.
Poonam Yadav is unstoppable as she picks 3 wickets today.
Bangladesh – 110/7 in 18 overs. #INDvBAN #TeamIndia #T20WorldCup
Live – https://t.co/Pknzdpr9fD pic.twitter.com/tFXCybMxij
— BCCI Women (@BCCIWomen) February 24, 2020
भारतीय संघाकडून पुन्हा एकदा पूनम यादवने चमकदार कामगिरी केली. तिने ४ षटकात १८ धावा देत ३ विकेट घेतल्या. शिखा पांडे आणि अरुंधति रेड्डी यांनी प्रत्येकी २ विकेट तर राजेश्वरी गायकवाडने १ विकेट घेतली.
#TeamIndia post 142/6 in 20 overs, the highest score of this #T20WorldCup so far. 💪
Over to the bowlers now. #INDvBAN
Live 👉https://t.co/Pknzdpr9fD pic.twitter.com/2ZftTKk9Td
— BCCI Women (@BCCIWomen) February 24, 2020
तत्पूर्वी, बांगलादेशने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले होते. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने शफाली वर्माच्या ३९(१७), जेमिमा राॅड्रिग्सच्या ३४(३७), वेदा कृष्णमूर्तिच्या नाबाद २०(११), रिचा घोषच्या १४(१४) आणि दीप्ति शर्माच्या ११(१६) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ६ बाद १४२ अशी मजल मारली होती.
बांगलादेशकडून गोलंदाजीत पन्ना घोषने ४ षटकात २५ धावा देत २ तर सल्मा खटुनने ४ षटकात २५ धावा देत २ विकेट घेतल्या. भारताच्या दोन फलंदाज जेमिमा आणि दीप्ति धावबाद झाल्या.