आॅकलंड : कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा आज न्यूझीलंडविरूध्द दुसरा एकदिवसीय सामना होत आहे. न्यूझीलंडने पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली आहे. त्यामुळे तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना ‘करो या मरो’ अशा स्थितीत आहे.
आॅकलंड येथील इडेन पार्क स्टेडियममधील मैदानावर सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागला आहे. कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना न्यूझीलंड संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
Captain @imVkohli wins the toss and elects to bowl first in the 2nd ODI against New Zealand. pic.twitter.com/DYkaYSCyzy
— BCCI (@BCCI) February 8, 2020
दरम्यान, पहिल्या सामन्यात भारताने ३४८ धावांचे विशाल लक्ष्य देऊनही न्यूझीलंडने विजय मिळवला होता आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसरा सामना जिकूंन भारत मालिकेत बरोबरी साधणार की न्यूझीलंड मालिकेत विजयी आघाडी घेणार, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.