दुबई | टी-20 विश्वचषकात सलग दोन पराभवांमुळे निराश भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला नमवलं असलं तरी पुढील फेरीत जाण्यासाठी अजून बरीच आव्हानं आहेत. त्यातील एक म्हणजे आजचा स्कॉटलंड विरुद्धचा सामना.
भारत विरूध्द स्कॉटलंड या महत्वपूर्ण सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा भारताच्या बाजूनं लागला आहे. ( India win the toss and elect to field against Scotland )भारतीय कर्णधार विराट कोहलीने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारताना स्कॉटलंड संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केल आहे.
सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने पुढील फेरीच्या भारताच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. पण अजूनही आशा शिल्लक असल्याने भारतीय संघ विजयासाठी सर्व प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आजच्या सामन्यात स्कॉटलंडला मोठ्या फरकाने नमवल्यास भारताला गुणतालिकेत फायदा होऊ शकतो. तर भारत पराभूत झाल्यास स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकते, त्यामुळे आजचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
दरम्यान, भारत असणाऱ्या ग्रुपमध्ये पाकिस्तानचा संघ 4 पैकी 4 सामने याआधीच सेमीफायनलच्या लढाईत पोहोचला आहे. आता या गटातून आणखी एक कोणता संघ जाणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
भारतीय संघ – केएल राहुल, आर शर्मा, व्ही कोहली, एस यादव, आर पंत, एच पांड्या, आर जडेजा, आर अश्विन, एम शमी, व्ही चक्रवर्ती, जे बुमराह
स्कॉटलंड संघ –
के कोएत्झर, जी मुन्से, एम क्रॉस, सी मॅक्लिओड, आर बेरिंग्टन, एम लीस्क, सी ग्रीव्हज, एम वॅट, एस शरीफ, ए इव्हान्स, बी व्हील