कोलकाता : विराट कोहलीच्या शतकानंतर इशांत शर्मा आणि उमेश यादव यांनी केलेल्या अचूक मा-याच्या जोरावर भारताने मालिकेतील दुस-या कसोटी क्रिकेट सामन्यात तिस-या दिवशीच बांगलादेशवर एक डाव आणि ४६ धावांनी विजय संपादित केला आहे. या विजयासह भारताने मालिकेत २-० असे निर्भेळ मिळवले आहे.
India win by an innings and 46 runs in the #PinkBallTest
India become the first team to win four Tests in a row by an innings margin 😎😎@Paytm #INDvBAN pic.twitter.com/fY50Jh0XsP
— BCCI (@BCCI) November 24, 2019
पहिल्या डावात २२ धावा देत ५ आणि दुस-या डावात ५६ धावा देत ४ गडी बाद करणा-या इशांत शर्माला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
कालच्या ६ बाद १५२ धावांवरून पुढे खेळताना आज बांगलादेशचा डाव ९ बाद १९५ धावसंख्येवरच आटोपला. ( बांगलादेशचा फंलदाज महमुदुल्ला जखमी होऊन निवृत्त झाला) बांगलादेशची धावसंख्या १५२ असताना एबादत होसैनला उमेश यादवने शून्यावर बाद करत सातवा झटका दिला.
त्यानंतर उमेशने मुशफिकुरला जडेजाकरवी ७४ धावांवर झेलबाद करत भारताचा विजय सुकर केला. त्यानंतर उमेशनेच बांगलादेशचा अखेरचा फलंदाज अल-अमीन होसैनला २१ धावांवर साहाकरवी झेलबाद करत भारतच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी बांगलादेशचा पहिल्या दिवस-रात्र व दुस-या कसोटी सामन्यात पहिला डाव १०६ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने ९ बाद ३४७ वर पहिला डाव घोषित करत २४१ धावांची आघाडी घेतली होती.
धावफलक :
बांगलादेश : पहिला डाव : सर्वबाद १०६. (शदमन इस्लाम २९, लिटन दास(निवृत्त) २४, इशांत शर्मा ५/२२, उमेश यादव ३/२९, मोहम्मद शमी २/३६)
भारत : पहिला डाव : ९ बाद ३४७ घोषित. ( विराट कोहली १३६, चेतेश्वर पूजारा ५५, अजिंक्य रहाणे ५१, अल-अमिन हुसेन ३/८५, इबादत हुसेन ३/९१, अबू जायेद २/७७, तैजुल इस्लाम १/८०)
बांगलादेश : दुसरा डाव : ४१.१ षटकांत ९ बाद १९५. ( मुशफिकुर रहीम ७४, महमूदुल्लाह ३९, अल-अमीन हुसेन २१, उमेश यादव ५/५३, इशांत शर्मा ४/५६).