India vs SriLanka – भारत आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना खेळला गेला. ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने श्रीलंकेला क्लीन स्वीप दिली आहे. तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने श्रीलंकेचा ३१७ धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाने एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रमी विजय नोंदवला आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर होता. २००८ मध्ये त्यांनी आयर्लंडचा२९० धावांनी पराभव केला होता.
ऑस्ट्रेलियन ओपनला उद्यापासून सुरुवात; राफेल नदालसह ‘या’ खेळाडूंवर सर्वांचे लक्ष्य
भारताने दिलेल्या ३९० धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ सुरुवातीपासुरूनच गडगडला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शिराजने पाहुण्या संघाच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने धडकीच भरवली. त्याने डावाच्या १० षटकांच्या आतच श्रीलंकेच्या प्रमुख ३ गड्यांना तंबूचा रस्ता दाखल होता. त्याचबरोबर मोहम्मद शमीनेही दमदार गोलंदाजी केली. श्रीलंकेचा कोणताही गोलंदाज २० पेक्षा अधिक धावा करू शकला नाही. त्यामुळे अख्खा संघ अवघ्या ७३ धावांतच गारद झाला. भारताकडून सिराजने ४ गडी बाद केले तर शमी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
IND vs SL | कोहलीच्या ‘विराट’ शतकाने मोडला श्रीलंकेच्या दिग्गज खेळाडूचा मोठा विक्रम
भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ५ गडी गमावून ३९० धावा केल्या. त्यामुळे आता पाहुण्या श्रीलंकेला विजयासाठी धावांचा मोठा डोंगर सर करावा लागणार आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या गड्यासाठी ९२ चेंडूत ९५ धावांची भागीदारी केली. रोहितचे अर्धशतक हुकले आणि तो ४९ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. यानंतर शुभमनने कोहलीच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी ११० चेंडूत १३१ धावांची भागीदारी केली.
शुभमन गिलने उत्कृष्ट खेळी खेळत ८९ चेंडूत आपल्या वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. हे त्याचे भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठरले. याआधी शुभमनने झिम्बाब्वेविरुद्ध त्याच्या घरच्या मैदानावर शतक झळकावले होते. शुभमन ९७ चेंडूत ११६ धावांवर खेळत असताना कसून राजिताने त्याला त्रिफळाचित केले. यांनतर कोहलीने श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ७१ चेंडूत १०८ धावांची भागीदारी केली. दरम्यान, कोहलीने ८५ चेंडूत एकदिवसीय कारकिर्दीतील ४६वे तर या मालिकेतील दुसरे शतक झळकावले.
या सामन्यात विराट कोहलीने ११० चेंडूंत १३ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद १६६ धावा केल्या. या खेळीसह विराट आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत पाचव्या स्थानावर आला आहे. श्रीलंकेकडून कसून रजिता आणि कुमार लाहिरूने प्रत्येकी दोन गडी बाद केले. त्याचवेळी करुणारत्नेला एक गडी बाद केला. या सामन्यात शेवटच्या पाच षटकांत भारताने ५८ धावा फाटकावल्याने मोठी धावसंख्या उभारली.