नवी दिल्ली – सातत्याने विकेट टिपणाऱ्या गोलंदाजांचा भारतीय संघात समावेश असल्याने आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाला विजेतेपद पटकावण्याची संधी सर्वात जास्त आहे, असे मत व्यक्त केले भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना द्रविड म्हणाला की, इंग्लंडमधील खेळपट्टी फलंदाजांना साथ देणारी असल्याने सर्वच संघ अडचणीत असताना भारतीय संघातील गोलंदाजांकडे कोणत्याही क्षणी बळी घेण्याचे कौशल्य असल्याने भारताला यंदाच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याची सर्वात जास्त संधी आहे.