नवी दिल्ली – परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचीच नव्हे, तर कोणत्याही खेळातील लढत जगभरात नावाजली जाते. आता या दोन संघांत द्विपक्षीय मालिका होत नसून केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकृत स्पर्धांमध्येच हे दोन संघ एकमेकांशी खेळतात.
आता याच दोन संघात बऱ्याच कालावधीनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टी-20 क्रिकेट सामना रंगणार आहे. 31 जुलै रोजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हा सामना होणार असून, त्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाने आपला संघदेखील जाहीर केला आहे.