मुंबई – पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत पाकिस्तान जेव्हा जेव्हा आमने सामने येतात तेव्हा तेव्हा क्रिकेटच्या मैदानासह जगभरात मोठा उत्साह पाहायला मिळतो. काही दिवसांत सुरु होणाऱ्या T २० वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तान २३ ऑक्टोबर रोजी आपापसात भिडणार आहे. अशावेळी दोन्हही देशांमध्ये यासाठी माहोल तयार व्हायला सुरुवात झाली आहे. अशात सोशल मीडियावर मिम्स आणि व्हिडीओ व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे अशात भारताच्या रोहित शर्माने महत्वाचं विधान करत सर्व नेटकऱ्यांसह चाहत्यांना समज दिली आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचसाठी याआधीच मौका मौका या गाण्याने काय ट्रोलिंग केलं होत हे सर्वांना माहिती आहे. परंतु गेल्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताला हरवत पराजयाचा डाग पुसून काढला होता. अशात आता पुन्हा हे प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार असल्यामुळे सर्वांच्या भारताकडून विजयासाठीच्या आशा वाढल्या आहेत. अशात रोहित शर्माला विचारण्यात आलं,ज्याप्रमाणे दोन्हही देशांत मॅचपूर्वी देशभक्तीचे वातावरण असते कधी कधी स्टेडिअममध्ये देखील खुन्नस पाहायला मिळते,पण हेच चित्र क्रिकेटर्समध्ये देखील असत का,मॅचपूर्वी कस वातावरण असत ?
यावर रोहितने दिलेले उत्तर अनेकांचे डोळे उघडणारे आहे. रोहित म्हणतो,आम्ही आशिया कप दरम्यान पाकिस्तानी खेळाडूंना देखील भेटलो तेव्हा कुटुंबियांची विचारपूस केली. गप्पा मारल्या नॉर्मल पद्धतीने बोललो शिवाय आमच्या आधीच्या जनरेशननं देखील अशाच चर्चा खेळाडूंसोबत व्हायच्या असं सांगितलं आहे. भारत पाक लढतीच महत्व आम्ही जाणतो परंतु त्याचा विचार करून आम्ही तणाव वाढवत नसल्याचे रोहितने स्पष्ट केले. रोहितचे हे उत्तर भारत पाक मॅचदरम्यान ट्रोलिंग उगा आव आणणाऱ्या चाहत्यांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे.
Rohit Sharma 🤝🏽 Babar Azam
📹: ICC | #INDvPAK | #T20WorldCup pic.twitter.com/w11JZQZdvT
— Grassroots Cricket (@grassrootscric) October 15, 2022