दुबई : टीम सोधी आणि ट्रेन्ट बोल्ट यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला केवळ 110 धावांत रोखलं. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यातही भारतीय फलंदाजी ढेपाळल्याचं पाहिलं मिळालं.
स्पर्धेत पाकिस्तानकडून मानहानिकारक पराभव झाल्यानंतर आज नाणेफेक गमावून भारतीय संघ फलंदाजीला आलेला. मात्र सलामीत बदल करूनही भारताला फारशी चमक दाखवता आली नाही. सलामी जोडी केवळ इशान किशन (4) आणि लोकेश राहुल (18) संघाच्या ३२ धावांवर तंबूत परतले.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोहितने 14 धावा केल्या. त्यालाही मोठी खेळी करण्यात अपय़श आलं. तर कर्णधार विराट कोहली 9 धावा करून बाद झाला. भारताचा निम्मा संघ 70 धावांत तंबूत परतला होता.
दरम्यान तळाच्या फलंदाजांना देखील अपयश आलं. रवींद्र जडेजाने सर्वाधिक नाबाद 26 धावा केल्या. तर हार्दिक पंड्याने २३ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला निर्धारित २० षटकांत 7 बाद 110 धावा करता आल्या.