कॅनबेरा – सलामीवीर के एल राहुलच्या अर्धशतकी आणि अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 167 धावांचे आव्हान ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारताना भारताला प्रथम फलंदाजाीस पाचारण केले होते. त्यानंतर भारताने 20 षटकांत 7 गडी गमावत 161 धावा केल्या.
भारताकडून सलामीवीर राहुलने 40 चेडूंत सर्वाधिक 51 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर अष्टपैलू खेळाडू रविद्रं जडेजाने 23 चेडूंत 5 चौकार व 1 षटकारासह नाबाद 44 धावांची खेळी केली. संजू सॅमसनने 23(15) आणि हार्दिक पांड्याने 16(15) धावा केल्या. याव्यतिरिक्त इतर फलंदाज शिखर धवन 1(6), विराट कोहली 9(9) आणि मनिष पांडे 2(8) हे फलंदाज झटपट बाद झाले.
ऑस्ट्रेलियाकडून मोईसेस हेनरिकेसने 4 षटकांत 22 धावा देत सर्वाधिक 3 तर मिशेल स्टार्कने 4 षटकांत 34 धावा देत 2 गडी बाद केले. याव्यतिरिक्त अॅडम झॅम्पा आणि मिचेल स्वीपसन या जोडीने प्रत्येकी 1 गडी बाद केला.