नवी दिल्ली – करोना व्हायरसच्या काळात भारताने दूरगामी आर्थिक सुधारणांचा पाया रोवला. भारताने या अडचणीचे संधीत रूपांतर केले, असा दावा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे.
भारतीय उद्योग महासंघाच्या परिसंवादात बोलताना सीतारामन म्हणाल्या की, गेल्या आठ महिन्यात केलेल्या आर्थिक सुधारणांच्या पायावर आगामी काळात उद्योगांना विविध क्षेत्रात जोरदार आगेकूच करता येणार आहे. की केवळ डागडुजी करण्यावर सरकार थांबले नाही तर आगामी काळात अर्थव्यवस्था कशी मजबूत होईल यासाठी आवश्यक त्या कायदेशीर सुधारणा करण्यात आल्या आहेत.
आगामी काळातही सरकारचा हाच दृष्टिकोन राहणार आहे. याचा उपयोग भारतातील उद्योगांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.