नवी दिल्ली – सन 2023 ची जी 20 परिषद भारतात होणार आहे. या परिषदेसाठी भारताचे शेरपा म्हणून वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आधी भारताचे शेरपा म्हणून सुरेश प्रभु काम करीत होते त्यांच्या जागी गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही परिषद 30 आणि 31 ऑक्टोबर अशी दोन दिवस होणार असून यावेळच्या परिषदेचे अध्यक्षपद इटालि भुषवणार आहे.
जी 20 हा जगातील आर्थिक दृष्ट्या सक्षम देशांची संघटना म्हणून ओळखली जाते. सन 1999 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे, तेव्हापासून भारत या संघटनेचा सदस्य देश आहे. तथापि भारतात या परिषदेचे पहिल्यांदाच आयोजन होत आहे. डिसेंबर 2022 पासून या संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे असणार आहे. या 20 देशांकडे जगाच्या एकूण जीडीपीच्या 80 टक्के जीडीपी आहे. आणि एकूण जागतिक व्यापारापैकी 60 टक्के व्यापार या 20 देशांमधूनच होतो. यावरून या जी 20 देशांच्या संघटनेच्या शक्तीची कल्पना येते.