नवी दिल्ली – करोनाच्या संकटाला घाबरून स्पर्धा पुढे ढकलण्यापेक्षा त्या सुरक्षीत वातावरणात सुरु कशा होतील हे पाहिले गेले पाहिजे. माझ्या मते भारतीय संघाने नियोजित ऑस्ट्रेलियाचा दौरा करावा. तरच क्रीडाविश्वाला सकारात्मक संदेश जाईल, असे मत भारतीय संघाचा माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे.
करोनामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात होत असलेल्या स्पर्धा सुरळीत होण्यासाठी बीसीसीआयनेच पुढाकार घेतला पाहिजे. येत्या ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा होत आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी, एकदिवसीय व टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. हा दौरा विनाकारण करोनाला घाबरुन रद्द केला जाऊ नये. भारतीय संघाने हा दौरा करावा आणि सर्वकाही सुरळीत होत आहे असा संदेश द्यावा, असेही गंभीरने सांगितले.