नवी दिल्ली : म्यानमारमधील रखीन प्रांतात वांशिक बंडखोरांच्या गटाने ओलीस ठेवलेल्या पाच भारतीय आणि म्यानमारच्या एका खासदारासह पाच नागरिकांची भारत सरकारने वेळीच हस्तक्षेप केल्याने मंगळवारी (दि. 5) सुटका करण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्रालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे. पाच भारतीय नागरिक, म्यानमार संसदेचे एक सदस्य, दोन स्थानिक वाहतूकदार आणि दोन स्पिडबोट ऑपरेटर यांचे अपहरण रविवारी अराकन आर्मी या बंडखोरांच्या संघटनेने केले होते. पलेत्वा येथून हे अपहरण करण्यात आले. हे भारतीय म्यानमारमधील कलादन महामार्ग प्रकल्पावर कार्यरत होते. या सर्वांची सोमवारी पहाटे सुटका करण्यात आली.
अराकन आर्मीच्या ताब्यात असताना हृदयविकाराने एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. या नागरिकाला दीर्घकाळापासून मधुमेहाचा त्रास होता, अशी माहिती मिळत आहे. सध्या या नागरिकांना मृतदेहासह यानगॉंनला नेण्यात येत आहे. तेथून त्यांना णारतात आणण्यात येईल,असेही यात म्हटले आहे.
अराकम आर्मी हा हा युनायटेड लिग ऑफ अराकन या संघटनेचा सशस्त्र गट आहे. रखीन प्रातांत अधिक स्वायतत्ता मिळावी म्हणून हा गटदशकभरापासून अधिक काळ सशस्त्र संघर्ष करत आहे. डोंगर चढत असताना या भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला, असे या संघटनेने म्हटले आहे.