माउंट माउंगनुई : लोकेश राहुलच्या शतकी आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिस-या व अखेरच्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडसमोर विजयासाठी २९७ धावांचे आव्हान ठेवले आहे.
Innings Break!
A fine century by @klrahul11 (112), gritty 62 by @ShreyasIyer15 help #TeamIndia post a total of 296/7 on the board.
Scorecard – https://t.co/Y0xJSkf7zK #NZvIND pic.twitter.com/fIwAIqpPUR
— BCCI (@BCCI) February 11, 2020
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने टाॅस जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारले होते. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ७ बाद २९६ धावा केल्या. भारताकडून लोकेश राहुलने ११३ चेंडूत (९ चौकार व २ षटकार) ११२ तर श्रेयस अय्यरने ६३ चेंडूत (९ चौकार) ६२ धावा केल्या. याशिवाय मनीष पांडेने ४२(४८), पृथ्वी शाॅने ४०(४२) धावांची खेळी केली. राहुलने या सामन्यात कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले.
💯
ODI century No.4 and his first at No. 5. What an impressive knock this has been from the versatile @klrahul11. He brings up his century in 104 balls with 9×4 and 1×6.#NZvIND pic.twitter.com/q8Vi5BK1I0
— BCCI (@BCCI) February 11, 2020
न्यूझीलंडकडून हेमिश बेनेटने १० षटकांत ६४ धावा देत सर्वाधिक ४ गडी बाद केले. काइल जेमीसन आणि जेम्स नशीमने प्रत्येकी १ गडी बाद केला.