बीजिंग – “भारत आणि पाकिस्तानने काश्मीरचा विषय शांततेने आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवावा”, असे चीनने पुन्हा एकदा म्हटले आहे. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केला गेल्याला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चीनने हा सल्ला दिला आहे.
जम्मू काश्मीर फेररचना विधेयक 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्यसभेमध्ये आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आले होते. हे विधेयक संसदेत मंजूर झाल्याला शनिवारी तीन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी वार्तालापादरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुन्यिंग यांनी काश्मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तानने शांततेने आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचे आवाहन केले.
याविषयी चीनची भूमिका स्पष्ट आणि कायम आहे. पूर्वीपासूनच हा विषय भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा आहे. आंतरराष्ट्रीय समुदायालादेखील ही भूमिका सांगितली गेली आहे, असे चुन्यिंग म्हणाल्या.
गोंदिया जिल्ह्यातील महिला अत्याचार प्रकरणाची “एसआयटी”मार्फत होणार चौकशी
मात्र जम्मू काश्मीरचा विषय पूर्णपणे भारताचा अंतर्गत विषय आहे. चीनसह अन्य कोणत्याही देशाला याबाबत भाष्य करण्याचा अधिकार नसल्याचे भारताने पूर्वीपासून म्हटले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निर्णयाला त्यांचाच पक्षातील नेत्यांचा विरोध