नवी दिल्ली : कोरोनाचा जनक म्हणून चीनला ओळखले जाते. चीनमधून संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. मात्र चीनने या विषाणूवर तेवढ्यात वेगाने नियंत्रण करण्यात यश मिळवले असल्याचे म्हणायला हरकत नाही कारण सलग तिसऱ्या दिवशी चीनमध्ये कोरोनाबाधित असणारे एकही प्रकरण समोर आले नाही. दरम्यान, हे यश मिळवण्यासाठी चीनने देशात काही कडक निर्बंध नागरिकांवर लादले आहेत.
प्रत्येकाला माहित आहे की अद्याप या प्राणघातक रोगाचा इलाज नाही, म्हणून मनात हा प्रश्न पडतो की चीनने हे कसे थांबवले? औषधाशिवाय चीनने या आजारावर मात कशी केली.
* डब्ल्यूएचओच्या मते, संक्रमित व्यक्ती संपर्कात आली तर 2.6 लोकांना हा विषाणू संक्रमित करू शकतो.
* विषाणूचा प्रसार पाच ते सहा दिवसांच्या आत 3500 लोकांमध्ये होतो.
* चीनने सर्वप्रथम याचा प्रसार केला. त्यांनी लोकांना घरा बाहेर जाण्यास मनाई केली.
* लाखो लोकांना घरामध्ये बंद करण्यात आले होते, शहरे लॉकडाउन होती, परंतु व्हायरसचा प्रसार खंडित करण्याचा हा एक मार्ग होता.
* लॉकडाऊनला काहींनी वैयक्तिक अधिकारांचे उल्लंघन म्हटले होते. परंतु हा बदल लोकांच्या सुरक्षिततेनुसार आवश्यक होता.
* सर्वात कठोर नियमांद्वारे चीनने लोकांना घरात वेगळे केले. कोणत्याही देशाच्या इतिहासात असे घडले नव्हते.
* कंपनी व कारखाने बंद केले, सार्वजनिक वाहतुकीवर बंदी घातली, लोकांना घरात कैद केले. असे केल्याने दररोज कोरोना विषाणूची प्रकरणे कमी होऊ लागली. या विषाणूचा प्रसार अचानक कमी झाला.
* अशाप्रकारे, चीनने कोट्यवधी प्रकरणे थांबविली आणि हजारो लोकांचे प्राण वाचवले. लोकांना घरांमध्ये बंदिस्त ठेवण्याचा परिणाम असा झाला की, गेल्या तीन दिवसांत चीनमधील एकही कोरोना बाधीत रुग्ण आढळला नाही.
आता भारतही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनसारखी पावले उचलू शकतो. त्याच पुढाकाराने पंतप्रधान मोदींनी आजच्या जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे.