नवी दिल्ली – देशाच्या विदेश धोरणावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशाचा आदर आणि ताकद सर्वत्र कमी होत चालली आहे. या स्थितीत काय करावे, हे सरकारला समजतच नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
“भारताचे विदेश धोरणाच्या चिंध्या झाल्या आहेत. आपण सर्वत्र ताकद आणि आदर गमावत चाललो आहोत. अशा स्थितीत काय करावे, हे भारत सरकारला समजत नाही आहे.’ असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
चाबहार रेल्वे प्रकल्पाला वित्तपुरवठ्याला होत असलेल्या विलंबाला इराणने भारताला वगळल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे. देशाच्या विदेश धोरणावरून राहुल गांधी आणि देशांतर्गत घडामोडींवरून कॉंग्रेस पक्ष केंद्र सरकारवर सातत्याने कठोर टीका करत आहेत.