इंदूर : सलामीवीर फलंदाज शिखर धवन व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्या कामगिरीवर आज येथे होत असलेल्या भारत व श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात लक्ष राहणार आहे. गुवाहाटीतील पहिला सामना पावसाने रद्द झाल्याने या सामन्यात विजय मिळवित नव्या वर्षाची आश्वासक सुरुवात करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज बनले आहेत.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूने लागला आहे. कर्णधार विराट कोहली याने क्षेत्ररक्षण स्विकारताना श्रीलंकेला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
Captain Kohli wins the toss and elects to bowl first in the 2nd @Paytm T20I against Sri Lanka.
Live – https://t.co/OExOCS35VC #INDvSL pic.twitter.com/6eDyVQxMX6
— BCCI (@BCCI) January 7, 2020
दरम्यान, भारताने या मालिकेपूर्वी विंडीजविरूध्दची टी-२० आणि वन-डे मालिका जिंकली आहे. हा विजयी धडाका कायम राखण्यासाठी टीम इंडिया उत्सुक आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील हा १८ वा टी-२० सामना असून, यापूर्वी १६ टी-२० सामन्यांत भारताने ११ तर श्रीलंकेने ५ विजय नोंदविले आहेत तर गुवाहटी येथील सामना पावसामुळं रद्द झाला होता.