नवी दिल्ली – न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघालाच विजयाची सर्वाधिक संधी आहे, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.
माझा पाठिंबा भारतीय संघालाच आहे. कोहलीच्या संघालाच विजयाची सर्वाधिक संधी असून सरावाला म्हणावा तितका वेळ मिळाला नसला तरीही संघाचा आत्मविश्वासच विजय मिळवून देईल, असेही सचिन म्हणाला.
न्यूझीलंडने नुकतीच इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली आहे. त्यांना येथील वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ मिळाला तसा भारतीय संघाला मिळाला नाही. मात्र, तरीही त्यांनी नेटमध्ये चांगला सराव केला असून सगळे खेळाडू आपल्या क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करतील, असेही सचिनने सांगितले.