जयपूर -आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतून बाहेर पडलेल्या व सुमार कामगिरी केलेल्या भारतीय संघाला आता आजपासून मायदेशात सुरु होत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत चमकदार कामगिरी करण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. प्रमुख खेळाडूंच्या विश्रांतीनंतर हिटमॅन रोहित शर्मा याच्या नेतृत्वाचा कस लागणार असून संघात संधी मिळत असलेल्या नवोदित खेळाडूंना आपल्या गुणवत्तेची साक्षही द्यावी लागणार आहे. क्रिकेटच्या या प्रकारात न्यूझीलंडने भारतावर सातत्याने वर्चस्व राखले आहे.
भारत विरूध्द न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या टी-20 सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा(टाॅस) कौल हा भारताच्या बाजूनं लागला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक (टाॅस) जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Toss Update from Jaipur:@ImRo45 has won the toss & #TeamIndia have elected bowl against New Zealand in the first T20I. @Paytm #INDvNZ
Follow the match ▶️ https://t.co/5lDM57TI6f pic.twitter.com/Xm3p91BgLG
— BCCI (@BCCI) November 17, 2021
दरम्यान, भारतीय संघाने यंदा नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत सुमार कामगिरी केली होती. भारतीय संघाला सुपर 12 फेरीतून उपांत्य फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
त्यातच न्यूझीलंडलाही अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांनाही ही मालिका प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जिंकवी लागणार आहे. सध्या दोन्ही संघांचे बलाबल पाहता समतोल संघातच ही लढत होणार असली तरीही मायदेशातच सामने खेळायचे असल्याने भारतीय संघाचे पारडे काहीसे जड राहणार आहे.
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, आर. अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड संघ – मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, टिम साऊदी ( कर्णधार), टॉड अॅस्टल, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.