महाराष्ट्रात वर्षभरात 42 हजार लोकांना
मुंबई: देशात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. 2018-19मध्ये महाराष्ट्रात 42 हजार 26 जणांना सर्पदंश झाला असून त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात नाशिकमध्ये सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडल्या असल्याचंही एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
जगातील सर्पदंशांच्या घटनांपैकी अर्ध्या घटना एकट्या भारतात घडत आहे. तसेच सर्पदंशाने दगावणाऱ्यांची संख्याही भारतात सर्वाधिक असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अहवालानुसार महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे 32जणांना साप चावल्याचे उघड झाले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 36, तामिळनाडूत 36 आणि गोव्यात 34 लोकांना साप चावल्याचं आढळून आलं आहे.
गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील जिल्ह्यातल सर्पदंशाच्या घटनांमद्ये वाढ झाली असून पश्चिम बंगालच्या 12 जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटना घडल्याचं आढळून आलं आहे. 2018-19 मध्ये नाशिकमध्ये सर्पदंशाच्या 4294 घटना घडल्या आहेत. पालघरमध्ये 3204, ठाण्यात 2655 , कोल्हापूर 2298 , पुणे 2102 , रत्नागिरी 1994 आणि जळगावमध्ये सर्पदंशाच्या 1842 घटना घडल्या आहेत.