नवी दिल्ली – देशातील कोरोना परिस्थितीबाबत बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी आज भारतातील मृत्युदर हा जगापेक्षा अधिक असल्याचा निर्वाळा केला. याबाबत बोलताना आरोग्य मंत्र्यांनी, ‘जगामध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडण्याचा दर ७ टक्के इतका असून भारतामध्ये मात्र कोरोनाग्रस्तांचा मृत्युदर ३ टक्के एवढा आहे.’ अशी माहिती दिली.
यावेळी गंभीर रुग्णांची आकडेवारी सादर करत हर्ष वर्धन यांनी, ‘भारतातील मृत्युदराचे प्रमाण जरी अधिक असले तरी देशभरामध्ये रुग्णांना चांगल्या प्रकारचे उपचार दिले जात असल्याने कोरोना रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.’ असं सांगितले. आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कोरोनाग्रस्तांपैकी केवळ ०.३३ टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 1.5% रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय तर 2.34% रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
देशातील रुग्णदुपटीचा कालावधी ११.३ दिवसांवर
गेल्या तीन दिवसांपासून देशातील रुग्ण दुपटीने वाढण्याचा वेग मंदावला असून सध्या देशामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होण्याचा दर ११.३ दिवस इतका आहे.
कोरोनामुळे दगावलेल्यांपैकी ८६ टक्के रुग्ण इतर व्याधींनी त्रस्त
देशातील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एकूण रुग्णांपैकी ८६ टक्के रुग्णांना इतर गंभीर स्वरूपाच्या व्याधी होत्या अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
Only 0.33% patients are on ventilators, 1.5% patients are on oxygen support and 2.34% patients are in ICU, which reflects the quality of care being provided across the country: Dr. Harsh Vardhan, Union Minister of Health. https://t.co/nfMOEJeFzI
— ANI (@ANI) April 29, 2020