अमेरिकेच्या गृह खअत्याच्या अहवालातील माहिती
वॉशिंग्टन : इंटरनेट आणि विशेषत: समाज माध्यमांचा वापर दहशतवादी टोळ्यातील भरती आणि त्यांना धर्मांध करण्यासाठी केला जात असल्याची भारताची चिंता कायम असल्याचे अमेरिकेच्या गृहमंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे.
व्हॉट्स ऍपमध्ये घुसखोरी केल्याचे प्रकरण प्रकाशझोतात आल्याच्या दुसऱ्या दिवशी अमेरिकन संसदेत दहशतवादावरील देशांतर्गत अहवाल 2018 सादर केला. भारतीय सरकारी अधिकारी दहशतवाद्यांची भरती आणि त्यांना धर्मांध बनवण्यासाठी इंटरनेटचा आणि विशेषत: व्हॉट्सऍपसारख्या समाजमाध्यामातील मेसेज सेवेचा वापर करतात, याबाबत चिंता व्यक्त करतात, असे या अहवालातील भारत या प्रकरणात म्हटले आहे.
भारताच्या गृहविभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध समाजमाध्यमांच्या अधिकाऱ्यांकडे दहशतवादी भरती आणि जातीय तणावासाठी माध्यमांच्या वापराबाबत नेहमी चिंता व्यक्त केली आहे. येवढेच नव्हे तर दक्षिण भारतातून इंटरनेटच्या माध्यमातून धर्मांध दहशतवादी गटांत सहभागी करून घेतल्याच्या घटना नोंदवल्या आहेत. तसेच त्यांना अफगाणीस्तानात पोहोचवण्यात आल्याचे पुढे आले आहे. पाकस्थित दहशतवादी संघटना, आदिवासी आणि ोंवादी बंडखोरांच्या हिंसाचाराचा अनुभव भारत नेहमी घेत आहे. पाकिस्तानमधून जम्मू काश्मिरमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांना भारताने नेहमी पाकिस्तानला जबाबदार धरले आहे. भारताने इसिसचा दहशतवादी हल्ले घडवून आणण्याचा कट उधळला होता, असे त्यात म्हटले आहे.
2018 मध्ये भारत आणि अमेरिकेतील दहशतावाद विरोधी सहकार्य वाढले आहे. असे त्यात स्पष्ट करण्यात आले आहे.