रांची – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवित मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. श्रेयश अय्यरचे नाबाद शतक व इशान किशनच्या आक्रमक 93 धावा भारतीय विजयाचे वैशिष्ट्य ठरली.
विजयासाठी मिळालेल्या 279 धावांचा पाठलाग करताना भारताला पहिले दोन धक्के लवकर बसले. कर्णधार शिखर धवन 13, तर शुभमन गिल 28 धावा करून बाद झाले. यानंतर इशान किशनने श्रेयस अय्यरसोबत तिस-या विकेटसाठी 161 धावांची दमदार भागीदारी केली.
घरच्या मैदानावर खेळत असलेल्या इशानने 93 धावांची तुफानी खेळी केली. तो आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण करू शकला नाही. मात्र, श्रेयसने ही संधी साधली. त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 113 धावा केल्या. त्याला संजू सॅमसने 30 धावा काढत विजयी साथ दिली.
1⃣1⃣3⃣* runs
1⃣1⃣1⃣ balls
1⃣5⃣ foursA game-changing knock from @ShreyasIyer15 as he bags the Player of the Match award! 👏👏#TeamIndia | #INDvSA pic.twitter.com/7kjHzj9MqW
— BCCI (@BCCI) October 9, 2022
तत्पूर्वी, रीझा हेंड्रिक्स आणि ऍडन मार्कराम यांनी केलेल्या शतकीय भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकाने 278 धावांपर्यंत मजल मारत भारतासमोर विजयासाठी 279 धावांचे लक्ष्य ठेवले.
नाणेफेक जिंकूत प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची सुरूवात निराशाजनक ठरली. सलामीवीर क्विंटन डिकॉक (5) आणि मलान (25) स्वस्तात माघारी परतल्याने त्यांची 10 षटकात 2 बाद 40 धावा अशी अवस्था होती. यानंतर ऍडन मार्कराम आणि रीझा हेंड्रिक्सने डाव सावरत मोठी भागीदारी केली. हेंड्रिक्सने आक्रमक खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. यासोबत मार्करामने आपले अर्धशतक पूर्ण करत तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली.
मोहम्मद सिराजला अखेर ही जोडी फोडण्यात यश आले. त्याने हेंड्रिक्सला 74 धावांवर बाद केले. तर वॉशिंग्टन सुंदरने माक्ररमचा अडसर दुर केला. माक्ररमने 89 चेंडूत 79 धावांची खेळी केली. यानंतर डेव्हिड मिलर आणि पार्नेल खेळपट्टीवर आले. मात्र भारतीय गोलंदाजांनी शेवटच्या 10 षटकात टिच्चून मारा केल्याने त्यांना 278 धावांपर्यत मजल मारता आली.
भारताकडून मोहम्मद सिराजने 38 धावांत 3 गडी बाद केले. तर वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, कुलदीप यादव आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले.