मॅंचेस्टर – पावसाच्या व्यत्ययामुळे मंगळवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये झालेला सामना 46.1 व्या षटकात थांबवण्यात आला होता. मंगळवारी खेळ ज्या षटकात, ज्या चेंडूवर थांबवण्यात आला होता, तेथूनच आज पुन्हा सुरू झाला. कालच्या धावसंख्येत न्यूझीलंडने आज केवळ 28 धावांची भर टाकली. न्यूझीलंडचा संघ 50 षटकांत 8 बाद 239 धावसंख्येपर्यत मजल मारू शकला. त्यामुळे विजयासाठी भारतीय संघाला 50 षटकांत 240 धावांचे आव्हान मिळाले आहे.
दरम्यान, भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. भारतीय संघाची सुरूवात खराब झाली आहे. भारतीय संघाचे आघाडीचे तिन्ही फलंदाज झटपट बाद झाल्याने भारताची 3.1 षटकांत 3 बाद 5 धावा अशी अवस्था झाली आहे.
Semi Final 1. 3.1: WICKET! KL Rahul (1) is out, c Tom Latham b Matt Henry, 5/3 https://t.co/NixsoE7TCH #IndvNZ #CWC19
— BCCI (@BCCI) July 10, 2019
न्यूझीलंडच्या मॅट हेनरी याने रोहित शर्माला आणि विराट कोहली याला 1 धावांवर माघारी धाडले आहे. तर ट्रेटं बोल्ट याने के एल राहुल यालासुध्दा केवळ 1 धावांवर माघारी धाडले आहे. त्यामुळे आता भारताची मदार ऋषभ पंत, दिनेश कार्तिक आणि एम.एस.धोनी यांच्यावर असणार आहे.