काठमांडु – भारत आणि नेपाळ या दोन देशांनी आज एक महत्वपुर्ण करार केला. त्यानुसार या दोन्ही देशांनी सन 2015 मध्ये आलेल्या भूकंपात ज्या प्रकल्पांचे नुकसान झाले आहे त्याचे फेरबांधणी करायचे ठरवले आहे. यातील 14 प्रकल्प सांस्कृतिक क्षेत्रातील आहेत तर 103 प्रकल्प आरोग्य क्षेत्रातील आहेत. 420 कोटी नेपाळी रूपये त्यासाठी खर्च येणार आहे.
भारतीय दूतावास आणि नेपाळी सरकारच्या संबंधीत प्राधिकरणाद्वारे आज या संबंधातील सामंजस्य करार करण्यात आला आहे. नेपाळमधील भुकंपानंतर तेथील फेरनिर्माणाच्या कामात भारताने एकूण 250 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मदत दिली आहे.
भारताने दिलेल्या मदतीतून नेपाळ मध्ये सुमारे 50 हजार घरे, 71 शैक्षणिक संस्था, 147 आरोग्य क्षेत्राशी संबंधीत इमारती यांच्या पुनर्रबांधणीचे काम केले गेले आहे. सन 2015 मध्ये नेपाळ मध्ये आलेल्या भूकंपात मोठी जीवित व वित्त हानी झाली आहे. त्यावेळी नऊ हजार लोक मरण पावले आहेत.