वॉशिंग्टन – करोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत भारताने इटलीला मागे टाकले. त्यामुळे मृतांच्या संख्येत भारत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे, असे जॉन हापकिन विद्यापीठाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारताच्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिलेल्या तपशीलाप्रमाणे, गेल्या 24 तासांत 779 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 35 हजार 747 झाली. जुलै महिन्यात 18 हजारांहून अधिक जणांचे बळी करोनामुळे झाले. त्यामुळे देशातील मृतांच्या संख्येने इटलीत झालेल्या मृतांच्या संख्येला मागे टाकले.
जॉन हापकिन विद्यापीठाच्या अहवालानुसार आता अमेरिका (एक लाख 52हजार 70 मृत्यू), ब्राझील 91हजार 263 मृत्यू), इंग्लंड (46हजार84 मृत्यू), आणि मेक्सिको (46हजार मृत्यू) हे चार देश मृतांच्या संख्येत भारताच्या पुढे आहेत.
भारतात पाच लाख 45 हजार सक्रिय बाधित असून 10 लाख 57 हजार 805 जण बरे झाले आहेत. शुक्रवारी दिवसांत 55 हजार बाधितांची विक्रमी नोंद झाली. तर बाधितांची संख्या 16 लाख 38 हजार 870 वर पोहोचली.