पोशेफस्ट्रूम : सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात बांगलादेशसमोर विजयासाठी १७८ धावांचे आव्हान ठेवले आहे.
#TeamIndia all out for 177.
The Bangladesh chase shall begin shortly.
Follow the #INDvBAN #U19CWC final live 👇👇https://t.co/WK6GcTF6Ou pic.twitter.com/QPCaRERUEJ
— BCCI (@BCCI) February 9, 2020
बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण स्विकारताना भारतीय संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं होते. त्यानंतर फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ४७.२ षटकात १७७ धावसंख्येवर आटोपला. भारतीय संघाकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने १२१ चेंडूत (८ चौकार व १ षटकार) सर्वाधिक ८८, तिलक वर्माने ६५ चेंडूत ३८ तर ध्रुव जरेलने ३८ चेंडूत २२ धावांची खेळी केली. या तीन फलंदाजांशिवाय इतर एकाही फलंदाजांला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारताचे प्रमुख फलंदाज दिव्यांश सक्सेना २, प्रियम गर्ग ८ तर सिध्देश वीर शून्यावर बाद झाला.
HUGE WICKET!
Shoriful Islam has Yashasvi Jaiswal caught at short mid-wicket 👀
Jaiswal goes for 88#U19CWC | #INDvBAN | #FutureStars
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) February 9, 2020
बांगलादेशकडून गोलंदाजीत अविषेक दास ९ षटकात ४० धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. शोरिफुल इस्लाम आणि तंजीम हसन शाकिबने प्रत्येकी २ तर रकीबुल हसनने हसनने १ गडी बाद केला.