जिनिव्हा – बालमृत्यू दर कमी करण्यात भारताला उल्लेखनीय यश आलं असून, जागतिक पातळीवर भारताने एक हजार जन्म होण्याच्या तुलनेतील मृत्यू दरानुसार 1990 मधील 126 वरून 2019 मध्ये 34 पर्यंत मृत्यू दर कमी केला आहे.
संयुक्त राष्ट्रांची बालनिधी संघटना म्हणजेच युनिसेफने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
भारतातील बालमृत्यू दर 4 पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे. 1990 मध्ये भारतात 34 लाख बालमृत्यू झाले होते, 2019 मध्ये हे प्रमाण 8 लाख 24 हजारांवर आले आहे.
नवजात अर्भक मृत्यूदर 1990 मधील 89 वरून 28 वर आला आहे.