नवी दिल्ली – देश “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा करत आहे. या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या बुरुजावरून मुख्य सोहळा पार पडला. पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले.
नेहमीप्रमाणे यावर्षीही लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन साजरा केला. यावेळी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंची उपस्थिती आकर्षणाचं केंद्र आहे. याशिवाय करोना योद्ध्यांसाठी विशेष ब्लॉकची व्यवस्था करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
– देशाच्या काही भागात आजही पूर, भूस्खलन होत आहे
-नरेंद्र मोदींकडून ऑलिम्पिक खेळाडूंचं अभिनंदन
-सर्वात मोठी लसीकरण मोहीम आपल्या देशात सुरु आहे.
-करोना संकटात मोफत धान्य
-आज संपूर्ण जग भारताला नव्या दृष्टीने पाहत आहे
-नॅशनल हायड्रोजन मिशनची घोषणा
-फाळणीच्या वेदना आजही जाणवत आहेत
-ऊर्जेसाठी आपण आत्मनिर्भर होण्याची गरज
-देशातील लोकांना आता अनावश्यक कायदे, प्रक्रियेतून मुक्ती
-सैनिक स्कूलमध्ये मुलींनाही प्रवेश देण्याच निर्णय
-केंद्र सरकारचा ई-काॅमर्स प्लॅटफाॅर्मची निर्मिती करण्याचा निर्धार.
-महिला गटांनी बनवलेल्या वस्तुंना जागतिक बाजारपेठ मिळवून देणार.
-कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार विविध योजना केंद्र सरकार आणणार.
भारत ३ बिलियन डाॅलर किमतीचे मोबाईल फोनची निर्यात करतो, महत्वाची माहिती.
-कालबाह्य झालेले नियम आणि प्रक्रिया रद्द करण्याचे केंद्र आणि राज्य सरकारांना आवाहन
कालबाह्य कायद्याच्या कचट्यातून देशाची सूटका करण्याची वेळ आहे.
-मातृभाषेतून सर्व प्रकारचे शिक्षण देण्याचा केंद्र सरकारचं धोरण.
-गरिबांना साक्षर करण्यासाठी मातृभाषेतून शिक्षण आवश्यक, असे सर्व महत्वाचे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून मांडले.