राजकोट : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-20 सामन्यांपैकी तिसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा T20 सामना जिंकण्यासाठी भारताने श्रीलंकेला 229 धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाने 20 षटकात 5 विकेट गमावत 228 धावा केल्या. सूर्यकुमारने 51 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या. त्याने सात चौकार आणि नऊ षटकार मारले.
A mighty batting display from #TeamIndia with Suryakumar Yadav dominating the show with an outstanding 1⃣1⃣2⃣* 🙌 🙌
Sri Lanka innings underway.
Scorecard 👉 https://t.co/hTaQA8AHr4 #INDvSL pic.twitter.com/x8TsVLOwGd
— BCCI (@BCCI) January 7, 2023
सूर्याशिवाय शुभमन गिलने 46 धावांची खेळी खेळली. राहुल त्रिपाठी 35, हार्दिक पांड्या 04, दीपक हुडा 04 आणि इशान किशन एक धावा काढून बाद झाले. अक्षर पटेलने नऊ चेंडूत नाबाद 21 धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने सर्वाधिक दोन बळी घेतले.
दरम्यान, सध्या दोन्ही संघ मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत. मुंबईतील पहिला टी-20 सामना भारताने जिंकला. त्याचवेळी पुण्यातील दुसरा सामना जिंकून श्रीलंकेने मालिकेत पुनरागमन केले. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असल्याने मालिका कोण जिंकणार हे या सामन्यातील निकालाने स्पष्ट होणार आहे.