IND vs SA T20I – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज खेळला जात आहे. हा सामना गुवाहाटी येथील बार्सपारा क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहे. सामन्यात सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावूमा याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने डावाची सुरुवात चांगली केली आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल हे सावध फलंदाजी केली आहेत.
भारतीय संघाने आजचा सामना जिंकला तर ३ सामान्यांच्या मालिकेत भारत २-० ने विजयी आघाडी घेईल. या मालिकाविजयासह भारताला मोठा इतिहास रचण्याची संधी असणार आहे. कारण भारतीय संघाला आजपर्यंत मायदेशात आफ्रिकाविरुध्द्व टी-२० मालिका जिंकता आलेली नाही. त्याचबरोबर भारताला सलग पाचवी टी-२० मालिका जिंकण्याची संधी असणार आहे.
गेल्या चार टी-२० मालिकांत भारताने आयर्लंड (२-०), इंग्लंड (२-१), वेस्ट इंडिज (४-१) आणि ऑस्ट्रेलिया (२-१) या संघांना हरवले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातील विजय हा भारतासाठी अनेक अर्थाने महत्वाचा असणार आहे. ( IND vs SA T20I chance for Indian team to create history by winning the match against South Africa)
भारतीय संघाच्या कोणत्याही कर्णधाराला मायदेशात दक्षिण आफ्रिका विरुध्द्व टी-२० मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे रोहितला त्याच्या कर्णधार पदाखाली हा इतिहास बदलून नवीन इतिहास रचण्याची संधी आहे. बातमी लिहिली त्यावेळेपर्यंत भारताची सामन्यातील धावसंख्या ९६ धावांवर १ गडी बाद अशी होती. केएल राहुल आणि विराट कोहली खेळपट्टीवर खेळत आहेत. रोहित शर्मा ४३ धावांवर बाद झाला आहे.