मुंबई – भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्याच्या मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना मुंबईत खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी अंपायरने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला ज्या पद्धतीने आऊट दिले. अंपायरच्या या निर्णयाची क्रिकेट विश्वात दिवसभर चर्चा होती.
everyone makes mistakes. i made one yesterday. you can only learn from them and move forward.
— Virat Kohli (@imVkohli) December 6, 2011
चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने एजाज पटेलचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान गोलंदाजाने अपील केले आणि अंपायर अनिल चौधरी यांनी विराटला एलबीडब्ल्यू आऊट दिले. यावेळी विराटला विश्वास होता की आधी चेंडू बॅटला लागल्यानंतर चेंडू पॅडच्या दिशेने आला. यामुळे विराटने रिव्हूव घेतला. मात्र टीव्ही रिप्लेमध्ये चेंडू आधी बॅटला लागला की पॅडवर लागला हे स्पष्ट झाले नाही. त्यानंतर तिसरे अंपायर वीरेंद्र शर्मा यांना मैदानावरील अंपायरच्या निर्णयाशी सहमती दर्शवावी लागली आणि त्यांनी विराटला बाद घोषित केले. यानंतर विराटचे 10 वर्षे जुने ट्वीट व्हायरल झाले आहे.
विराटचे 10 वर्ष जुने ट्विट होत आहे व्हायरल
थर्ड अंपायर वीरेंद्र शर्मा यांनी आऊट दिल्यानंतर यावर मत मांडणारे लोक दोन गटात विभागले गेले. काही लोकांचा असा विश्वास होता की विराट आऊट आहे तर काहींनी विराट नाबाद असल्याचे सांगितले. यादरम्यान विराट कोहलीचे एक 10 वर्ष जुने ट्विट व्हायरल झाले आहे. हे ट्विट विराटने 6 डिसेंबर 2011 रोजी त्याने केले होते. या ट्विटमध्ये विराटने लिहिले की, ”चुका सर्वांकडून होतात, काल मी सुद्धा चुका केल्या, तुम्ही चुकांमधून शिकू शकता आणि पुढे जाऊ शकता.”
विराटने व्यक्त केला संताप
अंपायरने चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्यानंतर विराट कोहलीने संताप व्यक्त केला. विराट मैदानाबाहेर जात असताना त्याने संतापात सीमारेषेजवळच्या छोट्या जाहिरातींवर बॅट मारली. या सामन्यात विराट मोठी खेळी करेल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा होती. पण हे होऊ शकले नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटला दोन वर्षांहून अधिक काळ झाला आहे मात्र त्याला शतकही करता आलेले नाही. त्याने शेवटचे शतक 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात केले होते.