इंदूर : भारत विरूध्द बांगलादेशदरम्यान इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिला कसोटीच्या तिस-या दिवशीच्या खेळास सुरूवात झाली आहे. बांगलादेशने दुस-या डावात फलंदाजीस सुरूवात केली असून बांगलादेशचे दोन्ही फलंदाज तबूंत परतले आहे.
Our pacers strike early on, on Day 3 of the 2nd Test. Both Bangladesh openers are back in the hut.#TeamIndia need 8 more wickets to win the 1st Test.
Live – https://t.co/kywRjNI5G1 #INDvBAN pic.twitter.com/1tVwPAYKrc
— BCCI (@BCCI) November 16, 2019
सलामीवीर शदमन इस्लामला ६ धावांवर इशांत शर्माने तर इमरूल केसला ६ धावांर उमेश यादवने त्रिफळाचित केलं आहे. सध्या बांगलादेशची धावसंख्या १०.० षटकांत २ बाद २० अशी आहे. बांगलादेश अजूनही ३२३ धावांने पिछाडीवर आहे.
दरम्यान, आज सकाळी (शनिवारी)भारतीय कर्णधार विराट कोहलीने कालच्या धावसंख्येवर म्हणजेच ६ बाद ४९३ वर पहिला डाव घोषित केला आहे. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावानंतर ३४३ धावांची मजबूत आघाडी मिळाली असून एक डाव राखून विजयाची संधी भारताकडे आहे.
India declare at 493 for 6 in their first innings. Lead Bangladesh by 343 runs. #INDvBAN
Live: https://t.co/kywRjNI5G1 pic.twitter.com/gXKG8lBYtY— BCCI (@BCCI) November 16, 2019