नवी दिल्ली – भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चेन्नई येथे उद्या दि. 22 मार्च रोजी तिसरा वनडे सामना होणार आहे. सीरीजमधील हा शेवटचा वनडे सामना आहे. तिसरी मॅच जिंकणारा संघ मालिकाविजेता ठरणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला होता. त्यामुळे उद्याचा सामना भारतासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.
आणि याच कारणामुळे संघाचा कर्णधार रोहित शर्मा या तिसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये महत्वाचे बदल करण्याची शक्यता आहे. तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे,
त्यामुळे उद्या चेन्नई येथे होणारा तिसरा वनडे जो संघ जिंकेल तो मालिका जिंकेल. त्यामुळे तिसऱ्या वनडेसाठी रोहित शर्मा काही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. उद्याचा हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहे.
रोहित शर्मा कुठल्या तीन खेळाडूंना टीममधून ड्रॉप करु शकतो, यावर आपण एक नजर टाकू…
सर्वप्रथम सूर्यकुमार यादवच नाव आहे. सूर्यकुमार यादवला या सीरीजमधील पहिल्या दोन वनडे सामन्यात संधी देण्यात आली. पण तो प्रभाव पाडू शकला नाही. आणि दुखापतग्रस्त श्रेयस अय्यरच्या जागी त्याला संधी मिळाली होती. पण त्याला त्याचा फायदा उचलता आला नाही.
फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवेल. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संधी दिल्या जाईल. कुलदीपला दुसऱ्या वनडेत वाट्याला फक्त एक ओव्हर आली.
तसेच, रोहित शर्मा टीममध्ये तिसरा बदल अक्षर पटेलच्या रुपाने करु शकतो. अक्षरच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळू शकतो. असं तिने मोठे बदल रोहित शर्मा करण्याच्या तयारीत आहे.