नवी दिल्ली -आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील भारत व पाकिस्तान यांच्यातील येत्या 24 ऑक्टोबरला होणारा बहुचर्चित सामना रद्द केला जावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केली आहे.
विशेष म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमधील मंत्री असूनही त्यांनीच अशी मागणी केल्यामुळे सर्व स्तरांवरून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या ज्या दहशतवादी कारवाया सुरू आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर भारत व पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
दोन्ही देशांमधील संबंध तणावपूर्ण आहेत हे सगळेच मान्य करत असताना हा सामना खेळला जावा, असा सवालही गिरीराज सिंह यांनी केला आहे.