मुंबई : जगात काही व्यक्ती अत्यंत अद्भूत असतात. ते कधी निवृत्त होतील ही कल्पनाही सहन करण्या पलीकडची. त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे शहनशाह अमिताभ बच्चन. पण, आता शरीर जाणीव द्यायला लागलेय, असे सांगत या शतकातील महानायकाने निवृत्तीचे संकेत दिले.
अमिताभ यांनी गेली चार दशक भारतीय सीनेसृष्टीवर अक्षरश: अधिराज्य गाजवले. त्यांच्या चाहत्यांना ते आजही हवे असतात. त्यांचे सिनेमे असोत किंवा कौन बनेगा करोडपती असो त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणारे प्रेमीजन त्यांची वाट पाहतात. पण वय… ते रोखण्याची कला बीग बीकडेही नाही किंवा अशाच आशयाचं वक्तव्य त्यांनी केलंय.
माझ्या शरीराला आता विश्रांती हवी आहे, असं जगातील सर्वात महान अभिनेत्यानं म्हटलं आहे.
शांतपणा… ताजेपणाचा दरवळ.. अगदी सुखद हिवाळ्यातील गारवा.. स्वच्छ आशादायक हवा… आणि सकाळी पाच वाजल्यापासून आता पर्यंत विश्रांती… या प्रवासात एक विनम्रता… एक स्वीकारहर्ततेचा विलक्षण आनंद… छोट्याशा गावातील राज्यात असणारा साधेपणा… त्यांचं विलक्षण आदरातिथ्य…. आम्ही त्यांच्या साधेपणाची आणि प्रामाणिकपणाची बरोबरी करूच शकत नाही. एक नवं वेगळं वातावरण आणि नव्या चौकटीशी पुन्हा जुळवून घेणं… त्याची बडदास्त ठेवणं… मला निवृत्त व्हायला हवे… माझ्या डोक्यात काही वेगळे विचार आणि बोटं काही वेगळंच लिहतायत… हा आहे त्यांचा संदेश…
अमिताभ बच्चन सध्या आलिया भट्ट आणि रणवीर कपूर यांच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटात सध्या काम करत आहेत. त्यासाठी ते मनिलाला मोटारीने प्रवास करत गेले. तेथे त्यांनी हा ब्लॉग लिहलाय. मात्र, काही जणअंच्या मते त्यांना हे म्हणणे अभिप्रेत नसावे, कारण डिसेंबरमध्ये त्यांचे परदेशांत शुटिंगचे नियोजन आहे. मंगळवारी अमिताभ बच्चन गेटवे ऑफ इंडियावर 26/11 तील हुताम्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी गेले होते. त्या मध्यरात्री त्यांनी आपले वडीलांची आठवण काढणारा ब्लॉग लिहला होता. त्यांच्या आठवणी सदैव माझ्याभोवती फेर धरतात असे त्यात त्यांनी म्हटलं होतं.