वर्षभरात आढळले 9 चिकनगुनियाचे रुग्ण; 359 रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह
कबीर बोबडे
नगर- जिल्ह्यात गेल्या महिन्यांपासून साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. डासांच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या डेंग्यूमूळे संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीन भागात देखिल ताप, खोकला आणि साथजन्य आजारांमुळे नागरिक त्रस्त आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2029 या वर्षभरात 359 रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचा आकडा हिवताप विभागाकडे संकलित झाला आहे. याहस कॉलरा, काविळ, टॉयफाईड अशा साथींच्या रोगांचाही फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला. यात 9 रुग्ण चिकनगुणियाचे, तर 2 रूग्ण हिवतापाचे आढळून आले आहेत. यामध्ये ग्रामीन हद्दीत र्डेंगूचे सर्वाधिक, तर ग्रामीन भागात चिकनगुनिया आणि हिवतापचे कमी रुग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी दिली. खाजगी रूग्णालयात यापेक्षा मोठा आकडा असल्याचे काही डॉक्टरांनी सांगितले.
गेल्या मागील दोन वर्षात डेंगू आजाराचा प्रकोप हा कमीलीचा वाढला असून ग्रामीन भागात अनेकांचा या आजाराने बळी घेतल्याची नोंद आहे. त्यावर कठोर उपाययोजना करतांना महापालिकेसह ग्रामीन आरोग्य यंत्रनेची चांगलीच दमछाक झाली. जानेवारी ते डिसेंबर 2019 मध्ये महापालिकेसह जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाअंतर्गत लाखो रूग्नांची तपासणी करण्यात आली. संशयित रूग्नाचे 1378 रूग्नांचे रक्तजल नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 359 रूग्न डेंग्यू पॉझिअव्हि आढहून आले. यामध्ये ग्रामीन भागातून 276 रूग्न डेंग्यू पॉझिटिव्ह, तर महानगर पालिका हद्दीत 83 रूग्ण डेंगू पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी यांनी दिली. यात सर्वाधिक रूग्न हे श्रीरामपुर, नगर, कोपरगाव तालूक्यात आढळून आले. चिकनगुनिया आजाराचे 9 रूग्न पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामधील सगळी रूग्ण हि ग्रामीन भागातील आहेत. हिवतापचे दोन रूग्न आढळून आले आहेत.
घराच्या आसपास असलेले टायर, शहाळे ह्या जागा स्वच्छ ठेवा. डास होणारच नाहीत याची प्रथम काळजी घ्या. डेंग्यू हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याबाबत जागृत होवून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. त्यादिवशी पिण्याचे पाणी साठवण्याचे भांडी स्वच्छ करून ठेवावे.
डॉ. बापूसाहेब गाडे , प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक