नवी दिल्ली – भारतीय विमान कंपन्यांनी ऑक्टोबरमध्ये 1.14 कोटी प्रवाशांची वाहतूक केली, जी सप्टेंबरमध्ये उड्डाण केलेल्या लोकांच्या संख्येपेक्षा 10 टक्के जास्त आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशांतर्गत हवाई वाहतूक गेल्या महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत 27 टक्क्यांनी वाढून 114.07 लाखांवर पोहोचली आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये हे प्रमाण 89.85 लाख इतके होते. करोना काळात विमान वाहतूक सेवेवर निर्बंध होते. त्यामुळे विमान वाहतुक थंडावली होती.
Indonesia earthquake : इंडोनेशियातील भूकंपातील मृतांची संख्या 268 वर, जखमींची संख्याही…
तसेच करोनाच्या काळात अर्थकारणही मंदावले होते त्यामुळेही विमान प्रवाशांची संख्या वाढताना दिसत नव्हती. परंतु आता मात्र विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अर्थव्यवस्थेने वेग घेतल्याचेही हे एक लक्षण मानले जात आहे.