मुंबई – राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा हळूहळू वाढताना दिसून येत आहे. राज्यामध्ये आज दिवसभरात 511 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 24 तासांमध्ये एकूण 324 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला असून राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,34,110 करोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.09 टक्के इतके झाले आहे. राज्यात सध्या एकूण 2361 सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1658 रुग्ण हे मुंबईतील आहेत.