मुंबई – टीआरपी घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत रिपब्लिकला पुन्हा नोटीस पाठवली आहेे. ही नोटीस चार पत्रकार, संपादकांविरुद्ध असून राज्य शासन आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याबाबत चुकीचे वार्तांकन करून पोलीस दलाची बदनामी केल्याप्रकरणी आहे.
यातच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपींची चौकशी करण्यात आली. यापैकी शिवानी गुप्ताकडे केलेल्या तपासात, त्यांच्या न्यूज रूममधील आय न्यूज नावाच्या सॉफ्टवेअरद्वारे आउटपुट शिफ्ट इंचार्जमार्फत तसेच चॅनलच्या आउटपुट डेस्ककडून टेलिप्रॉम्पटरद्वारे प्रसिद्ध झालेला मजकूर वृत्तनिवेदिका म्हणून वाचून दाखविल्याचे सांगितले.
पुढील तपासासाठी आवश्यक ती माहिती मागवलेली आहे. त्यामुळे आरोपींची जबाबदारी निश्चित करण्यात येईल. याबाबत संबंधिताकडून अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद आला नसल्याचेही थाेरात यांनी सांगितलेे.
तत्पूर्वी, टीआरपी घोटाळ्यामुळे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई गुन्हे शाखेने समन्स पाठविण्यात आले होते.