अकलूज – खंडाळी (ता. माळशिरस) येथील गोसावी वस्ती येथे लोकनिवारा केंद्र व जनहित ग्रंथालयाचे उदघाटन सोमवारी (दि. १३) बालचमुंच्या हस्ते करण्यात आले, अशी माहिती लोकनिवारा केंद्राचे प्रमुख सिताराम गोसावी यांनी दिली.
खंडाळी गावात आलेले विविध मान्यवर तसेच बेघर नागरिकांना राहण्यासाठी लोकनिवारा केंद्राचा तर गरजू विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जनहित ग्रंथालयाचा उपयोग होणार आहे, असेही गोसावी म्हणाले. यावेळी निर्मल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे स्वरूप गांधी, सरपंच बाबुराव पताळे पाटील, युवा नेते अमोल मेथा, व्यवस्थापक श्रीमंत कानगुडे, सतीश गोसावी, आबासाहेब गोसावी, लखन साठे, नितीन मांडवे तसेच विविध स्तरातील मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.