नवी दिल्ली – देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून देशभरातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. देशात सर्वात जास्त हिंसाचार झालेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला ४२ पैकी २२ जागांवर आघाडी मिळाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून या 42 लोकसभा मतदारसंघातील सुरुवातीचे कल हाती आले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीच्या सुरवातीला तृणमूल काँग्रेसला 22 जागांवर, तर भाजपला 19, काँग्रेसला 1, जागेवर आघाडी मिळाली आहे.