कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये सातत्यानं हिंसाचार पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालचे भाजपचे सर्व आमदार आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून रॅली काढत होते. जमावबंदी लागू असतानाही ममता सरकारविरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून रॅली काढण्यात आली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रूधुरांच्या कांड्या, पाण्याचे फवारे अशा प्रकारे वापर केला जात आहे. मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आली नाही.
#WATCH: Kolkata police baton charge at BJP workers on Bepin Behari Ganguly Street. They were marching towards Lal Bazar protesting against TMC govt. #WestBengal pic.twitter.com/RxIGPSqBGd
— ANI (@ANI) June 12, 2019
तत्पूर्वी, पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान दोन गटात आपापसात झालेल्या वादावादीनंतर हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात अनेक जणांचा मृत्यू झाला होता. यावेळी ए सुरक्षेसाठी ७१,५०० जवानांना तैनात करण्यात आले होते.