लखनौ – उत्तर प्रदेशात आज झालेल्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातल्या मतदानात 56 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. चाकिया (चांदौली), रॉबर्टसगंज आणि दुढ्ढी (सोनभद्र) या ठिकाणी मतदान सकाळी 7 वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी 4 वाजता मतदानाची सांगता झाली.
तर इतर ठिकाणी मतदान संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होते. या टप्प्यामध्ये आझमगड, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चांदौली, वाराणसी, मिर्झापूर, भादोही आणि सोनभद्र या जिल्ह्यांमधील विधानसभांच्या मतदारसंघांमध्ये मतदान झाले.
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 54.18 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगा च्या सूत्रांनी सांगितले. आझमगडमध्ये 52 टक्के, भादोहीमध्ये 54.टक्के, चांदौलीमध्ये 59 टक्के, गाझीपूरमध्ये 53 टक्के, जौनपूरमध्ये 53 टक्के, मऊमध्ये 55 टक्के, मिर्झापूरमध्ये 54 टक्के, सोनभद्रमध्ये 56 आणि वाराणसीमध्ये 52 टक्के मतदान झाले, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
या टप्प्यात 54 जागांसाठी 613 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणुकांचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे.