नवी दिल्ली : देशात सध्या अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणाने एकच गोंधळ उडाला आहे.
या प्रकरणाचा आता रिपब्लिक टीव्हीला जबर फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे याच मुद्यावरून मविआ सरकारकडून भाजपवर निशाणा साधला जात आहे. यातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपा नेत्यांना सवाल केला आहे.
फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!’
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 19, 2021
रोहित पवार यांनी ट्विट केले आहे की,’लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपाभक्त पत्रकाराला भाजपाच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपाच्या त्या नेत्यांनी सांगावं. फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!’,” असा सवाल रोहित पवारांनी भाजपा नेत्यांना केला आहे.