राजेगाव-राजेगाव परिसरातील पीके विजेअभावी जळू लागली आहेत. भीमा नदीपात्रात मुबलक पाणी असतानाही केवळ विजेच्या अनियमितपणामुळे पीके जळू लागली आहेत. परिसरातील राजेगाव, मलठण, वाटलूज, नायगाव, तवेगाव आदी भागातील ऊस, चाऱ्याची पीके करपू लागली आहेत. अतिरिक्त भारनियमन असले तरी देण्यात येणाऱ्या वीज पुरवठ्यातही कपात करण्यात येत आहे.
सतत होणारा विजेचा लपंडाव हा देखील शेतकऱ्यांची डोकेदुखी बनला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना संताप सहन करावा लागत आहे. केव्हाही आणि कधीही खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत उपाय योजना करायला अधिकारी वेळेत उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे तासन्तास वीजपुरवठा खंडित होत आहे. या परिसरातील सर्व गावांच्या वीज पुरवठ्याकडे लक्ष द्यावे लागते. कर्मचारी कमी पडत असल्यामुळे अजून अडचण निर्माण होत आहे.
एक दोन कर्मचाऱ्यांला लवकर कुठं काय झालय हे सापडत नाही, त्यामुळे अजून एखादा नवीन कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. बॅंकिंग सेवा, दूरसंचार सेवा, ग्रामपंचायती आदींचे संगणकीकरण झाले असले तरी विजेअभावी अनेकवेळा या सेवा ग्राहकांना मिळत नाहीत. वाटलूज व नायगाव परिसरात दिवसाआड वीज पुरवठा केला जातो, तो सुरळीत करण्याची मागणी येथील शेतकरी करत आहेत.आणि रात्री ची वीजपुरवठा दिला जातो तो जर दिवसा दिला तर जे दिवभर इकडे तिकडे फिरतात तेही फिरणारा नसल्याचे बोलले जात आहे.