नवी दिल्ली – इंडिया वन पेमेंट लि ही कंपनी सध्या दर महिन्याला देशात तीनशे ते चारशे एटीएम मशिन्स बनवते. या कंपनीने येत्या चार ते पाच वर्षात देशात किमान 20 हजार एटीएम मशिन्स बसवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे देशाच्या निमशहरी आणि ग्रामीण भागात लोकांना सहज प्रमाणात रोकड रक्कम उपलब्ध होऊ शकेल असे या कंपनीचे सीईओ के श्रीनिवास यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की भविष्यात रोकड काढण्याचे व्यवहार वाढणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात एटीएम मशिन्स बसवावी लागणार आहेत. ही एटीएम मशिन्स मेंटेन करण्याचे व ऑपरेट करण्याचेकाम व्हाईट लेबल एटीएमकडून केले जाते.
सध्या या कंपनीने देशात 10 हजार 300 व्हाईट मेटल एटीएम कार्यान्वित केले आहेत. याच कंपनीचे ब्रॅंड नाव इंडिया 1 एटीएम असे आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम नंतर ही दुसऱ्या क्रमांकाची एटीएम कंपनी आहे. चौदा राज्यात निमशहरी आणि शहरी भागात या कंपनीने ही एटीएम मशिन्स बसवली आहेत.